Saturday, March 14, 2015

माणसं

                                                                   माणसं
        समाजातला एक जीवंत घटक , खरंतर समाजाला जीवंत करणारा घटक . काही सारखे ,काही भिन्न, काही हुशार , शहाणे, काही खूप प्रेमळ तर काही कटकटी :p  प्रत्येकात एक न एक वेगळा गुण असतोच, एक कला असते, एक छंद असतो ज्याचा गंध कधी सरळ पसरतो तर कधी त्या गंधांची शाखा होऊन सर्वत्र  पसरतो...
         काही माणसं वेगळीच असतात , त्यांचा प्रत्येक गुण बघणं आपल्यासाठी एक सोहळाच असतो जणू .. आता हेच बघा न, दुसऱ्यांना समजावणारी , दुसर्यांच्या  मनातला ते सांगण्याआधीच जाणत असणारी...किती छान वृत्ती आहे न ही... न सांगता, न बोलता त्यांना आपली मनस्थिती  अलगद उमजते...जणू आपला आरसाच असतात ती.. दर्पणात कसा आपल्याला आपण दिसतो तसाच त्यांच्या दर्पणरुपी मनात आपल्याला आपण दिसतो :)
           चांगल्या वृत्तीची मनाला भावणारी खूप लोक भेटतात, काहींशी संवाद वाढतो , पुढे  मैत्री वाढते, काहींशी तिथला तिथेच राहतो तर काहींशी थोड्या काळानंतर पुन्हा जुळून येतो ... एका विशिष्ट ग्रुप ऑफ पीपल चं मला जाम अप्रूप वाटतं, अलग कलात्मक असतात राव ती.. सर्वच जमत त्यांना..सर्वगुणसंपन्न   हट्स ऑफ टू धेम ...  काही हुशार  , ज्ञानी, काही दानी, कर्तृत्ववान ..अलंकार असतात अशी माणसं समाजासाठी..
            काही माणसांच्या कलेत  रंगून जावस वाटतं, ज्ञानातून वाट काढावीशी वाटते, त्यांच्या कर्तृत्वात आपणही दैदिप्यमान व्हावासा वाटतं.. हं पण त्यासाठी नुसता वाटण्यापेक्षा "कृती" करावी लागणारे. काही सोपे पण महत्वाचे बदल केले पाहिजेत  आपण आपल्यात . आता ते नेमके कोणते ते प्रत्येकावर  आहे. माणसामाणसात भिन्न गुण असतात तसच ते बदल कोणत्या स्वभावात, कोणत्या गुणात करावे ते ही वेगळे असतात. विचार करा नक्की सापडेल :)
                             
                                                                                                             - अपूर्वा  :D

       

No comments:

Post a Comment