बैठ्या चाळीत
असल्या कारणाने विरंगुळ्यासाठी,
मोकळं, शांत वाटून
घ्यायचा असलं की कट्ट्यावर किव्हा घराच्या
उंबरठ्यावर बसून आठवणीच्या
ढगावर नेम धरते
मी. आणि काहीही
आठवतं, अक्षरशः काहीही
! एखादं गाणं, एखादी
व्यक्ती, एखाद्या व्यक्तीचा सहवास,
एखादी वस्तू ... काहीही
व कसाही. आपण
एकट असलो की निवांतपणे आठवणींना उजाळा
देऊ शकतो कोणीतरी
शेजारी असलं की आठवणींचा झूला दोघांच्या पेसनुसार झुलवावा लागतो... Soltitude is the best soulmate एकांताशी एकरूप होऊन
कधीकधी आपण रोजच्यापेक्षा
काहीतरी वेगळा करतो… प्रोडकटीव एकांत असतो. आठवणींना बहर येतो.. कुठच्या कुठे विचार पोहोचतो...माग अशा वेळी मला "सेलीब्रेशन" नाटकातील वंदना गुप्तेंचा संवाद आठवते जे त्या आपल्या मुलांना सांगतात ,"आठवणींच जंगल खूप विशाल असतं...एकटे गेलात तर हरवून जाल.. सोबत गेलात तर आनंद द्विगुणित होईल"
हा सर्व कल्लोळ मनात सुरु असताना अनपेक्षित पाऊस कोसळतो.. न सांगून येणाऱ्या पाहुण्यासारखा .. आणि आठवणींना एक वेगळीच दिशा मिळते, एक वेगळाच angle मिळतो... खड्ड्याच्या रस्त्यावर चाललेली गाडी जेव्हा सरळ, स्मूथ रस्त्यावर आल्यावर जो आनंद होतो न अगदी तशी भावना पावसाच्या आगमनाने मनात येते. असं म्हणतात आवाज मनाला विचलित करतात, शांतता भंग करतात ... पण पावसाच्या आवाजात जादू असते.. सर्व काही जुळवून आणण्याची.. मनाला शांत करण्याची.. मग हळूच आपण रिमझिम गिरे सावन ऐकतो, तर कोणी चिम्ब भिजलेले गातं, तर कधी वारा गायी गाणे म्हणत भिजून गेलेल्या वार्याला अनुभवत.. रणरणत्या उन्हात तुमच्यावर थोडासा शब्दमयी पाण्याचा शिडकावा केला :p थोड्या वेळाने पाऊस थांबतो पण मी मात्र पावसाच्याच आठवणीत अजूनही भिजलेली असते...त्याच्यातच गुंतलेली.. आयुष्यातही अशी माणसं असतात ज्यांच्या आपल्यासोबतचा प्रवास तसं पाहायला गेलं तर थोड्याच दिवसांचा अथवा वेळेचा असतो.. ती येतात पावसासारखी.. त्यांच्या जाण्याचा नेम नसतो... असला तरी surprise देतात कधी कधी.. असली तरी कायम नसतात... नदीसारखी असतात ...मनाला स्पर्शून पुढे जाणारी :)
- अपूर्वा
छायाचित्र सौजन्य -नओमी सिल्वर आर्ट्स (गुगल इमागेस )
छायाचित्र सौजन्य -नओमी सिल्वर आर्ट्स (गुगल इमागेस )
