एक निवांत संध्याकाळ ....
बसारीमधून ऐकू येणारे आर्त स्वर ,
त्यातच घुमणारा तबल्याचा ताकधीनचा आवाज,
चहूकडे दुमदुमलेली तीन तालाची पकड
आणि....
अशाच निवांत क्षणी
तुझ्या अंतरंगातील अनंत रंगांनी रंगलेल्या भावना
त्या कॅनव्हास वर शिंपड ....
ज्याप्रमाणे सागराच्या तळाला मोत्यासारखे रत्न
निर्माण करणाऱ्या शिंपल्याला
कर्णशिलांजवळ नेउन धरलं
तेव्हा सागराचा जसा निनाद ऐकू येतो
तसंच अगदी तसंच
त्या शिंपडलेल्या भावनांना हृदयाजवळ घट्ट धर ....
तोच तुला असं जाणवेल ....
की .... ती जणू तुझी प्रतिमाच आहे
जणू तुझं दुसरं अस्तित्त्वच आहे ....
तुझ्या शुद्ध स्वरूपातल्या मनाचे, बुद्धीचे, नीतीचे,
मतिचे, गतीचे ,विचारांचे आणि आचारांचे ....
ते कोलाजच आहे जणू.....
त्या कोलाजातील सुंदर दिसणारे
आणि कांतीने झळाळणारे ठिपके जोड
स्वतःला त्यामध्ये गुंतवून घे, समरसून घे
आणि जग .....
त्या कॅनव्हासवर तुला हव्यानाकोश्या
साऱ्या भावना शिपड आणि जग .... फक्त जग .....
- विश्वजीत
No comments:
Post a Comment