Tuesday, June 14, 2016



अशी माणसे येती!
             स्पृहा जोशी ची प्राजक्तही कविता मला खूप आवडते आणि जाणीव होते कि प्राजक्ता सारखी नाजूक, निर्मळ सुंदर गोष्टी, अनुभव, भावना, वस्तू ह्याचं ही आयुष्यात स्थान आहे. गुलाबाकडे विशालता असून सुद्धा काही माणसं प्राजक्ता सारख्या गोष्टींकडे वळतात. ते मोठे अवाढव्य नसले तरीही त्यात कोमलता, नाजुकपणा असतो आणि मुख्य म्हणजे ती त्या व्यक्तीची निवड असते.
माणसांना जाणून घेण्याचा आनंद वेगळाच असतो. काही माणसं नं वेगळंच असतं… त्यांच्याकडे सगळं असून देखील केवळ दुसऱ्यांच भलं व्हावं म्हणून झटत असतात...अगदी सर्व बाजूंनी परिपूर्ण असून सुद्धा दुसर्यांच्या प्रगतीसाठी त्यांची धडपड सुरुच असते. मग ते सध्या बोलण्यातून असो, अथवा शिकवण्यातून, आणि ते ही कोणतीही अपेक्षा न ठेवता. अत्यंत निरपेक्ष भावनेने आपल्या ज्ञानामृतचा, अनुभवामृतचा ठेवा लोकांना देत असतात. रक्ताच्या नात्या पलीकडची नाती असतात ही! खरंच समृद्ध असतात अशी माणसं आणि आपल्याला समृद्ध करतात!
जितकी प्रेमळ असतात अगदी तितक्याच हक्काने चुका सुद्धाही मोठ्या तत्परतेने सांगतात. त्यांच्याकडून शिकण्यासारखा खूप असतं. प्रत्येक गुणातून सदैव प्रेरणाच मिळत असते. एक उत्तम आणि well balanced व्यक्तीच असतात जणू! खरंच अशा माणसांच्या गुणांच्या नखाची सर जरी आम्हाला लागली तर आयुष्य सार्थकी लागल्याची धन्यता मिळेल.
स्वतःवर पूर्ण विश्वास असला की अख्ख जग जिंकता येत हे ते खात्रीपूर्वक सांगतात. गुरु, मित्र, तत्वज्ञ, दिशादर्शक अशी सगळीच रूपे त्यांच्यात एकत्र बघायला मिळतात ज्यांच्या बद्दल अप्रूप वाटणं चुकीचं ठरणार नाही. ह्या पृथ्वी वरील rare species मधील आहे ही जी आपल्या अनुभवाची, ज्ञानाची शिदोरी दुसर्यांच्या हितासाठी उघडतात.
ज्यांना किती ही धन्यवाद म्हटलं तरी पुरणार नाही असं योगदान असतं त्यांचं आपल्या जीवनात.
 आयुष्याच्या साठवणीतील आठवणीची माणसं!
- अपूर्वा

No comments:

Post a Comment